Skip to main content

देव आणि दारू


** देव हि मनाची दारू आहे ** दारू हि जरी पोटात रिचविलीजात असलीतरी मुळातच दारू (व्यसनं) हि मेंदूत शिरत असते,पोटात भुकेचा आगडोंब उसळला म्हणून लोक दारू पित नसतात तर डोक्यात विचारांचा आगडोंब उसळलेल्या माणसांची पाऊलं नकळतपणे दारुकडे,व्यसनांकडे वळत असतात,मनुष्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यालाच आपण ज्ञान असं म्हणत असतो तर ते ज्ञान हेच मनुष्याच्या मेंदूचं मुख्य खाद्यान्न आहे,मनुष्याच्या मेंदूला जेंव्हा ज्ञान नावाच्या या खाद्यानांची कमतरता भासू लागते अशा वेळी मग मेंदूला दारूचे किंवा व्यसनं करण्याचे एकप्रकारचे डोहाळे लागत असतात,डोहाळे लागलेल्या गरोदर महिला नकळतपणे त्या खडे माती आपल्या तोंडात टाकत असतात,पोटात वाढणारे मुलं आईच्या रक्तातील पोषक तत्व शोषून घेत असल्यामुळे अशा गरोदर मातेच्या शरीराला पोषक तत्वांची कमतरता जाणवू लागते,त्यामुळे त्यांचे हे कुपोषण नकळतपणे अशा डोहळ्यांच्या माध्यमातून ते व्यक्त होत असते,
दारू प्रमाणेच देव हा सुद्धा मनुष्याच्या कुपोषित मनाला लागलेले एकप्रकारचे डोहाळेच आहेत,मानवता हेच मानवी मनाचे मुख्य खाद्यान्न आहे,परंतु आपल्या मानवी जीवन संघर्षात आपली हि मानवता त्या गरोदर माते प्रमाणेच वेळोवेळी कुपोषित होत असते,परिणामी मानवी मनाचे हे कुपोषण देवदेवपणाच्या डोहळ्यांमधून वेळोवेळी ते व्यक्त होत असते,डोहाळे लागले म्हणून त्या गरोदर मातेने पूर्ण नऊ महिने खडे माती खात बसण्याची काहीच गरज नसते,चांगला सकस आहार घेण्या बरोबरच सोबतीला आवश्यक ते व्हिटॅमिन,आयर्न,कॅल्शियम,टॉनिक घेतल्यास त्या कुपोषित गरोदर मातेचे डोहाळे आपोआप दूर होत असतात,तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला जीवनाचा सत्य मार्ग हेच मानवी मनाचे कुपोषण दूर करणारे खरे टॉनिक आहे,परंतु हे कटू सत्याचे टॉनिक सर्वांनाच पचत नसते,म्हणूनच तथागत गौतम बुध्दांच्या अनुयायांनी सुद्धा बुद्धांना भगवान (देव) बुद्ध बनवून टाकलेले असल्याचे दिसून येते,देव तसेच दारूला (व्यसनं) आपण कितीही नाकारण्याचा प्रयत्न करीत असलो तरी बुडत्याला काडीचा आधार त्याप्रमाणेच दुःखी,कष्टी,ताण तणावग्रस्त लोकांना देव तसेच दारूच्या आधाराची गरज भासत असते,असे असले तरी देव तसेच दारूचा उदोउदो करणे हे मानवी विकासाच्या दृष्टीने हानिकारक ठरत असते,म्हणूनच ज्याप्रमाणे दारूला गाव वस्तीपासून तसेच महामार्गांपासून दूर दूर नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याचप्रमाणे देवाला सुद्धा जीवनातून दूर दूर नेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे....
*** संजय भगत.

Comments

Popular posts from this blog

दैत्यसुदन मंदिर,लोणार

दैत्यसुदन मंदिर, लोणार दैत्यसुदन मंदिर : राजा विक्रमादित्य यांनी अकराव्या शतकात हे मंदिर बांधले आहे. गावाच्या मध्यभागी विशाल जागेवर आहे. १८७८ साली मातीच्या टेकडीच्या उत्खनन केल्यावर याचा शोध लागला. हे मंदिर वास्तशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात लवणासुराच्या वधाबद्दल उत्तम शिल्प आहे. गर्भगृहात असणारी मूर्ती विष्णूची आहे. ती मूळ नाही. नागपूरचे राजे भोसले यांनी पाठवली होती. अशाच प्रकारचे मंदिर कर्नाटकातील हेलेबील बेलूर येथे चन्नाकेशव मंदिरासारखे आहे. इ.स. १८७८ मध्ये मातीच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करीत असता या मंदिराचे अस्तित्व लक्षात आले. उत्तराभिमुख महाद्वार असणाऱ्या या मंदिराचा आकार अनियमित ताऱ्यासारखा आहे. अनेकविध देवतांची शिल्पे आणि कामशिल्पे असणाऱ्या या मंदिरावर असणारे लवणासुर वध कथा हे विवर निर्मितीशी संबंध दर्शविणारे शिल्पादेखील आहे. याची कथा पद्म पुराणांत सांगितली आहे. उन्मत्त झालेल्या लवणासूर या दैत्याचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णूस केली तेव्हा या दैत्याला मी आघात रूपाने मारेन असे श्री विष्णूनी पृथ्वीला सांगितले. तेव्हा या आघात वेळी आपलाही नाश होऊ नये अशी व...

निळू फुले

निळू फुले: भूमिका घेऊन जगणारा (खल)नायक निळू फुले. केवळ नाव उच्चारलं तर डोळ्यासमोर उभा राहतो एक जबरदस्त खलनायक. आज या नायकाचा सातवा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा. भेदक डोळे, बेरकी नजर, भारदस्त आवाज आणि खास टोनमध्ये उच्चारलेले ‘बाई वाड्यावर या’ म्हटले की, डोळ्यासमोर येतो गावचा रांगडा पाटील. ज्याच्यात बेरकी, मुरब्बी, मस्तवाल आणि रंगेल स्वभावाचे बेमालून मिश्रण पहायला मिळते. हे मिश्रण उपजतच ज्याच्या व्यक्तीमत्वात होते ते व्यक्तीमत्व म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे सम्राट निळू फुले. केवळ नाव उच्चारलं तर डोळ्यासमोर उभा राहतो एक जबरदस्त खलनायक. आज या नायकाचा सातवा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा. आज निळू भाऊ आपल्यात नाहीत. माणूस म्हटलं की मृत्यू हा आला. तो कोणालाच चुकला नाही. त्यामुळे निळूभाऊही काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, त्यांचे कालाच्या पडद्याआड जाणे हे केवळ एक निमित्त. बाकी संपूर्ण निळूभाऊ आजही रसिकांच्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या स्मृती, त्यांचा अभिनय, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील त्यां...

व्यवसायच का करावा

व्यवसायचं का करावा. ------------------------------------------------- एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकान ात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते. एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.” या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला ए...